15 जाने 2011

मूलद्रव्य 'नामा'यण

२०११ हे वर्ष युनायटेड नेशन्सने 'आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष' (International year of Chemistry) म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त आपल्या दैनंदिन जीवनातील व परिसरातील रसायने आणि रसायनशास्त्र यांची ओळख करून देणारे पाक्षिक सदर, 'रस'आस्वाद, लोकसत्ता दैनिकाच्या 'चतुरंग' पुरवणीत सुरू केले आहे. त्यात १५ जानेवारी रोजी छापून आलेला माझा लेख.

सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक व्होल्टेर म्हणाला होता, 'What a heavy burden is a name that has become too famous' या उक्तीप्रमाणे सर्वच क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींना आपल्या नाममहात्म्याचे ओझे वहावेच लागते. नाव या गोष्टीविषयी अनेकांची अनेक मते आहेत. नावाविषयीचे बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी पावलेले विधान हे शेक्सपिअरच्या ज्युलिएट या नायिकेच्या तोंडी असलेले, 'What’s in a name?' हे असावे. कोणी अतिप्रसिद्ध नावाला ओझे मानो किंवा ‘नावात असे आहेच काय’ असा प्रश्न करो, शेवटी प्रत्येक व्यक्तीला, सजीवाला, वस्तूला आणि अमूर्त गोष्टींनाही नाव दिल्याशिवाय काही आपण रहात नाही. संपूर्ण विश्वात विविध रूपात आणि वेगवेगळ्या प्रमाणात अस्तित्त्वात असलेली मूलद्रव्ये (elements) तरी याला अपवाद कशी असतील?

संपूर्ण लेख : http://bit.ly/LS_15_01

2 जाने 2011

विनाशविरहित विकासवाटा

दिनांक २ जानेवारी २०११च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच ठाणे येथे पार पडले. साहित्य संमेलन हा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्याला कारणीभूत आहे ते मराठी भषिकांचे आपल्या भाषेवरील निस्सीम प्रेम आणि त्यांची रसिकता! भाषा आणि तिचा अनेकविध पद्धतीने वापर करण्याची क्षमता ही माणसाच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा पलू आहे. आपल्या जीवनाचे, असेच अनन्यसाधारण महत्त्व असलेले आणखी एक अंग म्हणजे विज्ञान. आपल्या दैनंदिन जीवनात मोबाइल फोनपासून फ्लायओव्हपर्यंत बहुविध रूपात अवतरणारे विज्ञान! कधी अ‍ॅटॉमिक बॉम्बसारख्या विनाशकारी स्वरूपात, तर कधी एखाद्या  लशीसारख्या जीवनदायी स्वरूपात सामोरे येणारे विज्ञान. पण अशा सर्वव्यापी विज्ञानाची आपण म्हणावी तशी दखल घेत नाही. शाळेत पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी गरजेचे असल्यामुळे ज्याचा अभ्यास करावा लागतो ते विज्ञान, ही आपल्या मुलांना होणारी विज्ञानाची पहिली ओळख. पण ही ओळख बदलून विज्ञानाबद्दल केवळ लहानग्यांनाच नव्हे, तर सर्वानाच उत्सुकता आणि जवळीक वाटावी- यासाठी महाराष्ट्रात काही संस्था आणि व्यक्ती अनेक वष्रे कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने दरवर्षी काही उपक्रम हाती घेतले जातात. त्यापकी एक आणि मोठा  उपक्रम म्हणजे ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन’.

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_02_01

26 डिसें 2010

विविधतेत समृद्धता

दिनांक २६ डिसेंबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

एखादा पदार्थ तुमच्या कितीही आवडीचा असला तरी रोजच्या रोज फक्त तो एकच एक पदार्थ तुम्हाला कोणी खायला लावला तर काही दिवसांतच तो पदार्थ तुम्हाला अगदी नकोसा होईल. तुमच्या आयपॉडमध्ये सतत एकच गाणे वाजत राहिले तर शेवटी वैतागून तुम्ही तो आयपॉड भिरकावून द्याल! कारण आपल्याला जीवनात वैविध्याची आवड असते. मानवामध्ये असलेली ही वैविध्याची ओढ अगदी त्याच्या आदिमानव रूपातही अस्तित्त्वात होती. वेगवेगळी फळे चाखून आणि अनेक प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाऊनच आपल्या पूर्वजांनी योग्य आहाराची निवड केली.   पण पुढे वैविध्यपूर्ण प्रगती मानवाला साधता आली, ती त्याच्यापुढे असलेल्या अनेकविध पर्यायांमुळे आणि हे पर्याय उपलब्ध झाले ते निसर्गातील विविधतेमुळे.

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_26_12

8 नोव्हें 2010

फटाक्यांचे अंतरंग

दिनांक ८ नोव्हेंबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

दिवाळी हा दिवे उजळण्याचा आणि फटाके उडविण्याचा सण मानला जात असला, तरी आपल्याला फटाके फोडायला कोणतेही कारण पुरेसे होते. लग्नाच्या वरातीपासून राजकीय नेत्यांच्या सभेपर्यंत कुठेही फटाके आपल्या नादविश्वात भर टाकून जातात. भारतात अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या उद्घाटन व समारोप समारंभांमध्ये आपण संपूर्ण जगाला मनोहारी आतषबाजीचे दर्शन घडविले. फटाक्यांच्या माळेचा कडकडाट, अ‍ॅटमबाँबचा धमाका, भुईनळ्यांची शिटी, फुलबाजातून निघणारी तेजस्वी फुले, सुंदर आणि रंगीबेरंगी ठिणग्यांचा पाऊस पाडणारा अनार, जमिनीवर गोलगोल फिरून आगीचे जणू एक वर्तुळच निर्माण करणारे भुईचक्र.. एक ना दोन, किती प्रकारचे फटाके!

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_08_11

24 ऑक्टोबर 2010

कल्लोळ आवाजांचा!

दिनांक २४ ऑक्टोबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

आपण बसमध्ये बसलेले असतो. बसचे इंजिन आणि हॉर्नच्या आवाजाबरोबरच आजूबाजूच्या ट्रॅफिकचा आवाजही सोबतीला असतो. बसमधले लोक मोठमोठय़ाने आपल्या मोबाइलवर बोलत असतात. त्यांच्याकडे आपण त्रासिकपणे बघतो. कुठेतरी रस्त्याचे, नाहीतर बिल्डिंगचे काम चालू असते. त्यामुळे आपल्या नादविश्वात त्या भरभक्कम यंत्रांच्या भरदार आवाजांची भर पडते. तेवढय़ात कुठूनतरी एक मिरवणूक वाजतगाजत येते आणि कानठळ्या बसवणारे ढोलताशे, सॅक्सोफोन यांचे आवाज आपल्या सहनशक्तीचा अंत पाहू लागतात. न राहवून आपण आपला मोबाइल व त्याचे हेडफोन्स बाहेर काढतो आणि हे सर्व नकोसे आवाज विरून जातील इतक्या मोठय़ा आवाजात आपली आवडती गाणी ऐकू लागतो. थोडय़ा वेळाने आपला मोबाइल वाजतो.. किंबहुना तो व्हायब्रेट होतो म्हणूनच केवळ आपल्याला त्याची जाणीव होते. मग आपण गाणी ऐकणे थांबवून कॉल घेतो. पलीकडून येणाऱ्या आवाजासारखेच अनेक कर्कश आवाजांचे पाश्र्वसंगीत सोबत असते. मग मोबाइलसकट तोंडावर हात ठेवून आपण बसमधील इतरांसारखेच मोठमोठय़ाने बोलू (?) लागतो.. या साऱ्या आवाजांच्या गदारोळात आपला आवाज पलीकडच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी!

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_24_10